“काही झाल नाही, २ महिने झाले त्याला माझ्याच कंपनीत जॉब मिळाला आहे,” मनाली ने बोलायला सुरुवात केली. “अरे व्हा, छान झाल, बोलावं त्याला कधी, काकूला विसरला का विचार त्याला, एक काम कर जेवायलाच बोलाव,” म्हणत सुधा ताई सोफ्यावर बसल्या. “येणारच आहे तो, पण जेवायला नाही,” मनालीला चांगलाच घाम फुटला होता. “काय झाल? पट्कन बोल मनाली!” सुधाताईला आता राग येत होता. “आई, आनंदला मी खूप आवडते आणि मला सुद्धा तो आवडतो. आम्ही एम.बी.ए पासून एकत्र आहोत पण आम्ही ठरवल होत जो पर्यंत नीट जॉब मधे सेटल नाही होत तोपर्यंत घरी नाही सांगायचं. आनंद चा हा २रा जॉब आहे , त्याला माझ्या पेक्षा तिप्पट पगार सुद्धा आहे. त्याचा स्वभाव तर तुला माहीतच आहे,” मनालीने पटापट सांगून दीर्घ श्वास घेतला.
सुधाताई हसायला लागल्या, “ओ वेडाबाई, तुला काय वाटल, मला काही माहीत नाही तुमच काय होत ते? कॉलेज पासून माहीत आहे. मी वाट बघत होते पोर कधी येऊन सांगते.” “आई तू माझी चेष्ठा करतेस कि काय ?” मनाली गोंधळली. ” आता बोलावच तू त्याला,” सुधाताई हसत बोलल्या. “पण आई तो गुजराती आहे, चालेल तुला?” मनालीने पुन्हा विचारला. “हो, न चालायला काय झाल? शिकलेली आहे मी, तो गुजराती असल्याने काय झालं.
मुलगा चांगला आहे.”
मनालीने आनंदला आईचा निरोप दिला आणि ते लगेच रविवारी भेटले, सगळं मनालीच्या मनासारख झाल, “आनंद, तुझ्या घरून तुझी पत्रिका मागवून घे बाळा , मी ताबडतोब गुरुजीला दाखवून आणते,” म्हणत सुधाताई किचन मध्ये गेल्या. “आई, तू पण ना! आता पत्रिका कशाला पाहिजे? सगळ तर माहीत आहे तुला आणि त्याच्या घरच्यांना देखील . तू तर बोलली होतीस शिकलेली आहेस तू, मग आता हे काय?” मनाली चिडून बोल्ली. “हे बघ पत्रिका पाहिल्या शिवाय, तुमचे गुण जुळल्या शिवाय मी लग्न लावून देणार नाही,” सुधाताईने स्पष्ट सांगितलं मनालीला.
मनालीची खूप चिडचिड होत होती, एकीकडे आईला आनंद परजातीचा असल्याचा काही फरक नव्हता पडत आणि दुसरीकडे त्याची पत्रिका मागवत होती. मनाली आणि आनंदने हतबल होऊन त्याची पत्रिका दिली सुधाताईंला . हातात पत्रिका येताच त्या तातडीने गुरुजीकडे गेल्या. मनाली आणि आनंदची टेन्शन ने हालत खराब झाले होती, कामात दिवसभर लक्ष लागलं नाही दोघांच. संध्याकाळी मनालीच्या फोनवर आईचा मेसेज आला, “ऑफिस मधून येताना आनंदला सोबत घेऊन ये घरी.” मेसेज वाचून दोघानचंही तोंडाचं पाणी पाळाल. “आई काय झाल? काय बोलले गुरुजी? ” मनालीने दार उघडताच प्रश्न विचारल. “मी ताट वाढते जेवताना बोलूयात,” सुधाताई ताटात जेवण वाढायला लागल्या आणि मनाली आणि आनंद फ्रेश होऊन आले. घरात शांतता पसरली होती, “हे लग्न होऊ शकत नाही मनाली. आनंदच्या पत्रिकेत मंगळ आहे. हे लग्न झाल तर तुम्हा दोघांना सुद्धा त्रास होईल आणि हे मला मान्य नाही,” सुधाताईने दोघांना कळवले. “नाही म्हणजे, आम्ही हे पत्रिका वैगरे वर अजिबात विश्वास ठेवत नाही. आम्हाला लग्न करायचं आहे आई,” मनालीने रागात उत्तर दिलं. आईचा आणि मनाली चा खूप वाद झाला पण दोघी त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.
शेवटी मनाली आणि आनंदने आईच्या विरोधात जाऊन लग्न केल. कित्येक वर्ष त्या दोघी बोलल्या नाही, सुधाताईने शहर बदलले, फोन नंबर बदलला. लग्नाला ५ वर्ष झाले होते, मनाली आणि आनंद सुखाने संसार करत होते, दोघे कामात यशस्वी होतेच, त्यांना २ वर्षांची एक मुलगी सुद्धा होती. आनंदच्या पत्रिकेतल्या मंगळाने त्यांच काहीच वाकडं नव्हत केल. एकदा फॅमिली हॉलिडे साठी मनाली, आनंद आणि त्यांची सोनू नेपाळला गेले आणि योगायोगाने त्यांना सुधाताई तिकडे भेटल्या . मुलीला बघून त्या खूप रडल्या, आनंद आणि सोनूला पाहून खूप खुश झाल्या, सगळ्यांना मिठीत घेऊन बोल्या, “मी तुम्हाला लग्नात आशीर्वाद नाही देऊ शकले पण तुम्ही दूर गेल्यावर मी रोज देवाकडे तुमच्या खुशाली साठी प्रार्थना करत राहिले. एकदा आनंदचा एक इंटरव्हिव सुद्धा वाचला पेपरात, तेव्हा समाधान झाल, माझी चूक मला समजली होती पण कोणत्या तोंडाने तुमच्याकडे येते मी ? नाही आले मी तुमच्या कडे, स्वतःला दोष देत राहिले आणि त्या माझ्या अंधविश्वासाला. फक्त माझ्या लेकीला माझ्या पासून दूर केलं ह्याने. मला माफ करा पोरांनो. मनाली आणि आनंदचे पण डोळे भरून आले, “सासूबाई, शेवटी काय महत्त्वच आहे.. आम्ही सगळे ठीक आहोत आणि आपण सगळे पुन्हा एकत्र आलो. चला आता रडू नका, आशीर्वाद द्या. आम्हाला तोच पाहिजे बाकी काही नाही,” आनंद आणि मनालीने आईला नमस्कार केला.
Nice
Nice….
Mast
Thank you
Thank you
Thank you