माझे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते, ते पण एका खाजगी शाळेत, त्यामुळे त्यांना तीन महिन्यातून एकदा पगार मिळायचा. घरी नेहमीच तंगी असायची. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी पारिस्थी अशी होयची की घरात किराणा सुद्धा उरायचा नाही.

एकदा तर फारच अडचण झाली, घराचा हफ्ता, आमचं संगोपण, सगळच अवघड होऊन बसल होत. घरी चहा पावडरचा एक दाणा उरला नव्हता आणि आणायला एक खोटा पैसा नाही जवळ.
सकाळी उठलो आणि दात घासून बाहेर ओट्यावर बसलो. दूध तर कधी नशिबात नव्हतच, त्या दिवशी चहा पण नव्हता. शेजारच्या मावशी बाहेर त्यांच्या ओट्यावर भांडी धुवत होत्या, आम्हाला बाहेर बसलेलं बघीतल त्यांनी. त्या घरात गेल्या आणि दोन रुपये घेऊन आमच्या घरी आल्या. आईच्या हातावर ते दोन रुपये ठेऊन बोलल्या, ” जा चहा पावडर घेऊन ये, पोरांना तरी चहा पाज सकाळचा.”
दोघींचे डोळे भरून आले, पण लगेच डोळे पुसून कामाला लागल्या दोघी. वडिलांचा पगार झाल्यावर उमा मावशीचे पैसे परत केले, पण अश्या उधारी कधीच फेडता येत नसतात. शेजारी असेच उपयोगी येतात, पण आज तशी नाती राहिली नाही.
Old days never come again attachment was there. Today only selfish n greedy behaviour everywhere
True.. the human touch is missing in every aspect of life.
Na bolta problems samjun ghenare lok khup rarely miltat