माझे लहानपण खेड्यात गेले अगदी अशा खेड्यात कि तेथे गोड पदार्थ म्हणजे गूळ आणि कधीतरी दिसणारी पांढरी साखर त्या काळी माझ्या कुटुंबात सर्वांसाठी गुळाचा चहा बनला जायचा.चहा पितळीनेच पिला जायचा कारण असलेले कप हे फक्त आलेल्या पाहुण्यांसाठी वापरले जायचे. घरी गायी व म्हशी असल्यामुळे घरात दुधाची कमतरता नसे. घरात लहान-मोठी अशी आम्ही 24 भावंडे होतो त्यातील काही पुण्याला शिकण्यासाठी होती. घरात सर्वात लहान मी होते. घरात लहान मुलांना प्यायला दूधच मिळायचे तेही सकाळच्या वेळी न तापवलेलं कारण गोठ्यातून आलेल्या चरवीतुन लगेच मुलांना दूध दिले जायचे, पण कधीतरी हट्टाने गोड काहीतरी हवे म्हणून मुलांनी हट्ट केला तर लहान मुलांना थोडाफार चहा मिळायचा.
असाच एकदा मी आईकडून हट्टाने चहा घेतला आणि त्याच वेळेस माझे भाऊ सोपान पुण्यावरुन घरी आले होते मला आईने चहा पितळीत दिला होता तो मी पीत असताना त्यांनी तो काढून घेतला आणि ओतून दिला कधी चहा प्यायचा नाही असा सज्जड दम दिला आईलाही न देण्यास सांगितले तेव्हा जो चहा बंद झाला तो लग्न होईपर्यंत लग्न झाल्यानंतर चहा बनवायला लागायचा पण तो चांगला की वाईट समजत नसे कारण मला खरी चहाची चव कोणती चांगली_ वाईट फरकच माहित नव्हता हळूहळू घरातल्यांच्या आवडीप्रमाणे बनवायला शिकले मी अजूनही चहा घेत नव्हते.
पुढे मला लग्नानंतर आठ वर्षांनी पुष्पक माझा मुलगा झाला आणि तो नर्सरीला D. A.V.School मध्ये जाऊ लागला आणि त्याची शाळेची बस सकाळी साडेसहाला यायची म्हणून मला लवकर उठावे लागे पण लवकर उठण्याचा कंटाळा यायचा म्हणून मी अधी-मधी चहा स्वतःसाठी बनवायची. हळूहळू सवय कधी वाढत गेली ते समजलेच नाही आणि आता सकाळची सुरुवात अगदी कडक चहाने होते_ आता मात्र चहाची चव चांगली छान कळते. तरीही तो घरचाच लागतो मी कधीही बाहेर चहा घेत नाही हॉटेलचा तर बिलकुल नाही अशी माझ्या जीवनातील चहाची साता उत्तराची कहाणी सुफळ संपन्न.
Nice
Thank you @Shalaka
अप्रतिम
Thank you @Dr. Tushar😊
👌👌
Thank you @Apeksha