माझ्या दिवसाची सुरुवात नेहमीच चहाने होते आणि मला लागतो एकदम परफेक्ट चहाचा कप. योग्य प्रमाणात कडकपणा, योग्य प्रमाणात साखर आणि सुंदर असा रंग, तेव्हा कुठे त्या गरम चहाला मज्जा येते. पण कधी आपल्यावर अशी वेळ येते कि तो चहा कसाही असो फक्त प्यायला मिळाल्याशी मतलब.
काही वर्षांपूर्वी मी आमच्या भजनी मंडळातून आसनगाव येथे एका मैत्रिणीकडे गेले होते, आम्ही १०-१२ बायका ऐरोली हून सकाळी निघालो. आसनगावचा रस्ता तसा तासभाराचा असेल, गप्पागोष्टी मधे वेळ कसा निघून गेला समजलच नाही. मैत्रिणीच्या घरी स्वामी समर्थांचा पाठ होता, पाठ झाल्यावर मग जेवण झाल, आमच सर्वांच मग २ तासभर भजन झाल, मग पुन्हा नाश्ता झाला, चहाची वेळ टळून गेली पण चहा काही मिळाला नाही. आता सगळ्या बायका संभ्रमात, चहा कसा मागवा. बाहेर पाऊस सुरू होता, चहाची ओढ वाढतच होती. मग ज्या मैत्रिणीच्या घरी भजन करायला गेलो होतो, तिच्या मैत्रिणीने आम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिले, ” मी बाजूलाच राहते, फक्त ५ मिनिटांसाठी या ना माझ्या घरी. आता एवढ आग्रह केल्यावर आम्ही गेलो तिच्याकडे, ५ मिनिटे गप्पा मारल्या आणि ती चहा घेऊनच बाहेर आली. सगळ्यांचा चेहरा लगेच खुलला, मनातल्यामनात मी बोलले, ‘ देवा सारखी धावून आलीस’. चहा पाजनाऱ्यांना स्वर्गात वेगळीच जागा असते.
Awesome
Thanks for reading
Nice
Thanks for reading
Are wah, Chai Lovers madhe Mavshi pan aahet 😀