तीनही भावंड एकत्र ग्रामपंचायतीच्या शाळेत जायचे, रुपाली ७वीला, मोठा भाऊ १०वीला आणि लहान ६विला. भूषण दादाचा शाळा सुटल्यावर रोज एक तास ज्यादा क्लास असायचा, मग रुपाली आणि अक्षय एकत्र घरी जायचे. घरी जाताना भूषण दादाची दादागिरी नसायची म्हणून दोघे अगदी नाचतच असायचे आणि बाजारातून चिंच-आवळे-बोरं घेऊन, ते संपवून घरी पोहोचत.
एक दिवशी, अक्षयचं नेमक शाळेला निघायच्या वेळी पोट दुखायला लागल, कळवळून रडत होता बिचारा, मग काकीने त्याला पाठवल नाही शाळेत. शाळा सुटल्यावर भूषण दादा ज्यादा क्लास साठी थांबला आणि रुपाली एकटी घरी जाण्यास निघाली. चालता चालता गाणी गुणगुणत होती, मस्त रमतगमत जात होती. अचानक समोरून एक विशीतला मुलगा आला, त्याने रुपालीचा हात पकडला आणि तिला जवळ खेचल, इतक जवळ कि त्याचा श्वासोच्छ्वास तिला जानवत होता. रुपालीला घाम फुटला, तिचा आवाज जसा घश्याने गिळून टाकला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी तिची धडपड चालू होती, रुपाली शांत झाली, दिर्घ श्वास घेउन तिने त्या मुलाला लाथ मारली आणि पळत सुटली. नशीब चांगल म्हणून कि काय तिचे काका तिला थोड्या वेळातच दिसले. पुतणीला इतक घाबरलेले पाहून तिला थेट घरी घेउन गेले.
झालेला प्रकार रुपालीने घरी सांगितला. तिच्या आईने तिला छातीशी धरल, मायलेकी खूप रडल्या. घरच्यांनी पोलिस तक्रार सुद्धा केली. दोन दिवस रुपाली घरीच थांबली, झालेला किस्सा सारखा आठवत होता, तिचा थरकाप होत होता.
आईने ठरवले कि रुपालीच शिक्षण इथेच थांबवायचे. पण रुपाली अभ्यासात हुशार होती म्हणून तिच्या काका आणि वडिलांनी ह्यातून वाट काढली. ” आम्ही तिला रोज शाळेत सोडवू आणि परत घरी घेउन येउ,” काका बोलले. हे ऐकून रुपाली खुश झाली, ” चालेल मला.” ” ते ठिक आहे पण शाळेतून घरी आल्यावर बाहेर कुठेच जायच नाही. आमच्या बिना अजिबात बाहेर पडायचे नाही,” आईने बजावले.
मग काय रुपालीला काका सोडवायला जायचे, बाबा आणायला जायचे, दर रविवारी आई सोबत मंदिर, भाजीपाला होयचा. घराबाहेर पुन्हा ती कधी एकटी पडलीच नाही. दहावीच वर्ष आल आणि सगळ तसच सुरु होत, भूषण दादा सारखं रुपालीला शाळेत ज्यादा क्लास असायचे पण आई बोलली,” काही गरज नाहिये त्याची, तु हुशार आहेस आणि काय करायच आहे शिकून, दहावी करून घे, आम्ही लग्न लावून देउ तुझ. उगाच रोज जिवाला धाकधुक. नवऱ्याकडे जा मग आम्ही सगळे मोकळे.” हे ऐकून रूपालीला वाईट वाटायचे, आपलीच आई अस कस बोलू शकते ह्याचा विचार यायचा. पण तिला शिकायच होत, स्वतःच नाव करायच होत जगात, तिने ठरवले घरचे जे बोलतील तसच वागायचे आणि लग्न झाल्यावर पुढे शिकायचे.
दहावीचा निकाल लागला आणि रुपाली शाळेत प्रथम आली, तालुक्यात देखील ती प्रथम आली. सगळे तिच कौतुक करत होते. तिच्या मैत्रिणी पुढच्या शिक्षणासाठी तयारी करत होत्या आणि रुपालीच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघत होते. काही काळ गेल्यावर एक उत्तम स्थळ आल. मुलगा तालुक्याचा तलाठी होता, खूप नाव त्याच. रुपालीला वाटल हा मुलगा नक्की तिला पुढे शिकायला मदत करेल. घरच्यांनी थोडी विचारपूस करुन जोरात रुपालीच लग्न लाऊन दिल.
नवीन घरात रुपाली लगेच रमली. सगळ्या कामाला नोकर, दिवसभर काय करायचे हे तिला सुचायच नाही. एक दिवस नवरा कामावरून आला, ” आहो, माझा दिवस फारच हळू जातो. काहीच काम नसत. मी माझ शिक्षण पूर्ण करु का?” ” अग करना. नक्की कर. पण मला त्यात काही करायला लावू नकोस. तुझी तु कर सगळ,” रुपालीच्या नवऱ्याने चोख उत्तर दिले.
दोन दिवसांनी रूपाली सकाळी नवऱ्याला चहा देत बोलली,” आहो मला जरा कॉलेजला सोडवता? फोर्म भरायचा आहे आज.” ” मी कशाला येउ? घरा समोर गाडी आहे, ड्रायव्हर आहे. नाहीतर दोन मिनिटांत बस स्टॉप आहे. उगाच अश्या सवयी लाउ नकोस,” तलाठी साहेबांनी प्रेमाने सांगितले. रूपालीने शाळेत झालेलं प्रकरण त्यांना सांगितले नव्हते. त्यांना हे माहीत नव्ह्ते कि त्यांची बायको किती वर्ष झाले एकटी बाहेर गेली नव्ह्ती.
खूप हिम्मत करुन रुपाली घराबाहेर गेली, कॉलेजला पोहोचली, सगळी कामं व्यवस्थित केली. घरी येताना मस्त भाजीपाला घेउन आली. खूप हलक वाटले तिला. रोज ती कॉलेजला एकटी जाऊ लागली, रविवारी मस्त साहेबांसोबत बाहेर फिरायला जायची. रुपालीचा आत्मविश्वास वाढला होता, ती बिंधास्तपणे बाहेर जायची, ती पुन्हा मोकळा श्वास घ्यायला लागली होती. स्वातंत्र्य काय असते हे ती अनुभवत होती.
Photo credit: https://www.monthlybrands.com.pk/amp/whats-hot-articles-blogs/articles-blogs/how-feminism-has-empowered-women/
Superb ……very much heart touching.
Thank you
Thank you so much
,mast
Thank you
Good one …..
Thank you